Wednesday, March 26, 2014

होय मराठीच

असं म्हणतात, 'मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो,
पण कधी चुकून कोणाला लाथ लागली
तर तोच माणूस मनापासून पाया देखील पडतो.
थोडे विचित्रच आहोत आम्ही..
पण लई भारी आहोत...!
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई
पुना नव्हे पुणे म्हणा..
बॉम्बे नाही मुंबई म्हणा..
नासिक हे नाशिक आहे हे लक्षात घ्या..
वांद्र्याचा बॅंड्रा होऊ देऊ नका..
थाना नाही ठाणे आहे..
आणि सर्वात महत्वाचं इंडिया नाही भारत आहे..
प्रत्येक अश्या गोष्टीसाठी व्यवस्थित लक्ष द्या.
आणि काही झालं तरी..
आपण महाराष्ट्रीयन पेक्षा,
महाराष्ट्रीय आहोत हे विसरू नका..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
गर्व आहे शेंदूर गुलालाचा
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा
गर्व आहे त्या विठोबा अन् माऊलीचा
आणि
गर्व आहे मला या मराठी रक्ताचा
!! जय महाराष्ट्र !!
देवा तू मला पुढच्या वेळेस कुठलाही जन्म दे मला काही एक वाटणार नाही.
कारण ह्याच जन्मी मला तू स्वर्गा सारख्या मराठी मुलुखात
मराठी म्हणून जन्म देऊन धन्य केलंस !!
मराठी माणसाला जो नडला त्याला तोडला

No comments:

Post a Comment